शुक्रवार, १ जून, २०१२

अन्नदाता शेतकऱ्यांसाठी मा. आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी गडचिरोली येथून रक्तदानाने केली आंदोलनाला सुरुवात

दि. १ जून २०१२: गडचिरोली येथे आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रक्तदान करून आंदोलनाला सुरुवात केली.
शासन दरबारी शेतकऱ्यांच्या विविध व महत्वपूर्ण मागण्या प्रलंबित आहेत. या
पूर्वी आ. बच्चू कडू यांनी नागपूर येथे पिक्माल निर्यात बंदी तोडो आंदोलन
केले. नंतर मा. मुख्यमंत्र्यांच्या गावी पाच मागण्या घेऊन डेरा आंदोलन
केले. त्या आंदोलनामध्ये मुख्यामान्त्यानी सकारात्मक भूमिका घेत सदर
मागण्यांवर प्रस्ताव तयार करणार अशी घोषणा केली. परंतु कोरडवाहू
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण वगळता बाकीच्या मागण्या अजूनही प्रलंबित
आहेत. 
त्याच कारणावरून आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्र
स्वीकारला आहे. दि. ४ जूनला मुंबई येथे आ. बच्चू कडू सहा शेकडो शेतकरी
बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच शेतकर्यांना या हक्काच्या लढाईत
सामील  होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनात संजय देशमुख, विदर्भ प्रमुख, प्रहार, पप्पू देशमुख,
जिल्हाप्रमुख चंद्रपूर , प्रवीण हेन्डवे, जिल्हाप्रमुख अमरावती, शी
विजुदादा कडू, शेतकरी नेते, फिरोज पठाण, रुपेश घागी, इम्मू भाई, डॉ.
मधुकर गुम्बळे सह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा