शुक्रवार, २९ जून, २०१२

१ जुलै रोजी अमरावती येथे प्रहारचा कार्यकर्ता मेळावा


 प्रहारचा कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक १ जुलै २०१२ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित केलेला आहे. प्रसिद्ध वक्ते शिवरत्न शेटे यांचे 'शिवराय आज असते तर...' या विषयावर व्याख्यान सकाळी ११.३० ला आयोजित केले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सतत शिवरायांचे नाव वापरणारी अनेक मंडळी या महाराष्ट्रात आहेत. परंतु जनतेच्या हिताची नीती राबवणारे उत्तम प्रशासक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवराय सामन्यापर्यंत कधीच प्रभावीपणे पोहचविण्यात आलेले नाहीत. म्हणूनच शिवरायांचे शेतकरी, मुसलमान, भ्रष्टाचार याविषयीचे खरे विचार कधीच जन-सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन 'स्वराज्याची' घडी नीट बसविण्याएवजी, सारा देश सामन्यांचे प्रश्न सोडून, टी.आर.पी. वाढविणाऱ्या आणि प्रसिद्धी देणाऱ्या प्रश्नांचे राजकारण  करत राहतो. खरे शिवराज कार्यकर्त्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या माध्यमातून होणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व आ. बच्चू कडू हे प्रामुख्याने उपस्थित असतील व मेळाव्यास मार्गदर्शन करतील.

जून महिन्यात गडचिरोलीत रक्तदान, राज्यात ठिकठिकाणी मेळावे व आझाद मैदान येथे उपोषण करून आ.बच्चू कडू व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लावले. या आंदोलनानंतर प्रहारचा हा पहिलाच मेळावा. विदर्भातील विविध जिल्ह्यातून प्रहारचे शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित असतील.  

रविवार, १० जून, २०१२

उपोषण मागे



शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत   ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही  ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. दि. 7 जून रोजी    त्यांच्या उपोषणाचा ४थ  दिवस होता.  त्यांची तब्येत खालावली होती. वजन ३ किलोंनी कमी होऊन  रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण कमी झाले. अशातच आ. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ  शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ जावंधिया यांनीही वर्धा येथे आमरण उपोषणास सुरुवात केली.     






याच  दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी भजन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते व शेतकरी तहसील कार्यालयांबाहेर भजन करून शासनाला सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली व तहसिल्दारांमार्फात मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठविले.चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, धुळे, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांत हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री महोदयांनी 7 जुन रोजी दुपारी ४ वाजता आंदोलकांसोबत बैठक आयोजित केली. कोरडवाहू मिशन स्थापन करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच इतर मागण्यांसंदर्भात समिती स्थापन करून त्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ठेवण्याचे आदेश दिले. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बलीराज्यासाठी महत्वाचे दान पदरात पडून घेत बच्चुभाऊ यांनी उपोषण मागे घेतले.    

बुधवार, ६ जून, २०१२

कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणास भेट


शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत   ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही  ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. 





आज ६ जून रोजी महाराष्ट्राचे कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बच्चू कडू व इतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आर. पी. आय. चे राजेंद्र गवई  यांनी आज बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः  एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आज  आ. बाळा नांदगावकर,आ.  शरद पाटील , आ. वीरेंद्र जगताप, आ. बळीराम शिरसकर, आ. अनिल बोंडे, आ. अनिल अण्णा गोटे, आ. वसंतराव खोटरे, आ. दीपकराव केसरकर आदींनी शुभेच्छा भेटी दिल्या. 

मंगळवार, ५ जून, २०१२

आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर भजन-ठिय्या आंदोलन: प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन


शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत   ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही  ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. ग्राहकांच्या आधी शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा, देशाच्या धोरणातच ते दिसायला हवे या महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या उपदेशाचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. ती आठवण व शेतकरी हिताचे धोरण या सरकारला राबविण्यासाठी आपण भाग पाडू असा निर्धार प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला.
 नंतर भाववाढीसाठी फसवी आंदोलना करण्यापेक्षा , अमुलाग्र बदल घडवू शकणार्या मागण्या घेऊन प्रहाराने सुरु केलेल्या या आंदोलनास राज्यातील अनेक आमदार, शेतकरी नेते व शेतकऱ्यांचे समर्थन प्राप्त होत आहे. परंतु हि लढाई आता मुंबईबरोबरच गाव-गावात लढली जावी. ठीक-ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे.  आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर शेतकरी-कष्टकर्यांनी- शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी  भजन-ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन  प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर भजन करून, या शासनाला सद्बुद्धी देण्यासाठी देवाला साकडे घाला. तसेच आपल्या भावना निवेदनाद्वारे तहसिलदारामार्फात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाव्या अशा सूचना प्रहारतर्फे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.    
 'न्याय मिळायला उशीर होणे हे न्याय न मिळण्यासारखे आहे.' गेल्या ५०-६० वर्ष शेतकरी वाट पाहतोय. आमचा अंत सरकारने पाहू नये.  आंदोलनाचा शांततामय मार्ग हि आमची 'एकमेव' पसंती नसून 'पहिली' पसंती आहे, हे शासनाने लक्षात ठेवावे असा इशाराहि प्रहारचे विदर्भ-प्रमुख संजय देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा  संजय देशमुख,विदर्भ-प्रमुख ९८२२६५७५०६, सुहास गोलांडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख ९८५५२५५४५४, पवन वासू, अमरावती ९०१११०८८६८ ,गजूभाऊ कुबडे, वर्धा ९४२००६०६६१,  राजेश पाखमोडे, भंडारा ९६३७६३२६३०, बाळा जगताप, वर्धा ९८२३५४०८८८ ,प्रदीप देशमुख, चंद्रपूर ७५७८६८७१७१, धर्मेंद्र तारक, यवतमाळ ९४२०५४९१९२, वैभव मोहिते, बुलढाणा ९८२२५०५०५

सोमवार, ४ जून, २०१२

अन्नदाता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आ. बच्चू कडू यांचे रक्तदान करून अन्नदान आंदोलन सुरु


आज ४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता आ. बच्चू कडू यांनही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तिरंगा पूजनाने आमरण उपोषणास सुरुवात केली. बलराम जखड, माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनीही बच्चुभाऊ यांना शुभेच्छा पाठविल्या.

 
bसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीराई धरणग्रस्त यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
















आर. पी. आय. चे राजेंद्र गवई यांनीही आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांसह उपोशांस्थालास भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. त्यांनी किमान एक दिवस बच्चू भाऊ सह  या उपोषणात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. आर. पी. आय. चे कार्यकर्ते यापुढे गाव-गावठी आंदोलन सुरु करतील असे राजेंद्र गवई म्हणाले.

यावेळी  आ. रवी राणा यांनीही हजेर राहून आंदोलनास पाठींबा दर्शविला.

रविवार, ३ जून, २०१२

धुळे येथील जाहीर सभेत आ. शरद पाटील तसेच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रप्रमुख रवी देवांग यांचा बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा शेतकरी आंदोलनास पाठींबा


गडचिरोली येथे रक्तदान करून मुंबईकडे निघालेल्या शेतकरी रालीचे आज ३ जून रोजी धुळे येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आ.बच्चू कडू शेतकरी--शेतमजूर -कष्टकरी-प्रकल्पग्रस्त- अनुशेष-गावातील गोरगरीब यांचा लढा पुढे नेताना ४ जून रोजी आझाद मैदान मुबई येथे आमरण  उपोषणास सुरुवात करीत आहेत.  या आंदोलनास धुळे जिल्हा शिवसेना व असंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वतीने पाठींबा देण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली आ. बच्चू कडू यांनी सुरु केलेली हि लढाई सर्वसामान्य शेतकऱ्यांची लढाई आहे. गोरगरिबांची लढाई आहे. संघटीतपणे धोरणात्मक बदल घडविण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत आ. शरद पाटील यांनी आ. बच्चू कडू यांच्या खांद्यास खांदा लावून लढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी  धुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांसह आ. शरद पाटील यांनी आ. बच्चू कडू यांना 'रुमने' देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले.  


सरकार शेतकऱ्यांची सतत पिळवणूक करीत आहे. खरे म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या  आत्महत्या नसून सरकारचे शेतकरी विरोधी धोरणाने केलेल्या हत्याच आहेत. आधी डेरा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेतल्या. शेतकऱ्यांच्या सुगीच्या दिवसाची हि सुरुवात आहे. परंतु अजूनही अनेक महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य व्हायच्या आहेत. यासाठी आम्ही मुंबईत जी लढाई सुरु करतोय, त्याची आग शेतकऱ्यांनी गाव-गाव पर्यंत पोचवावी. असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.



शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रप्रमुख रवी देवांग यांनीही बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला. 

या सभेप्रसंगी आ. बच्चू कडू , शरद पाटील यांच्यासह  प्रहारचे विदर्भाप्रमुख संजय देशमुख, अतुलभाऊ सोनावणे, शिवसेना जिल्हाप्रमुख धुळे, शेतकरी नेते रवी देवांग , लीलानंद माली, धुपेंद्र लांगे , प्रहारचे प्रवीण हिंडवे, मंगेश देशमुख, गजू कुबडे, प्रफुल डाफ आदी मान्यवर उपस्थित होते.    

शनिवार, २ जून, २०१२

शेगाव येथील सभा !



मा. आ. बच्चू कडू, शेगाव येथील सभेत, "शेतकऱ्यांनो, या आंदोलनासाठी १५ दिवस काढून ठेवा .... पिकविण्यासाठी वर्षभर मेहेनत घेताच , आता शेतीचा योग्य धोरण आणि हमीभाव यासाठी आपला नांगर शेतात घालायचा आधी सरकारी कार्यालयांत घाला ... जय बळीराजा !!!"












शुक्रवार, १ जून, २०१२

अन्नदाता शेतकऱ्यांसाठी मा. आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी गडचिरोली येथून रक्तदानाने केली आंदोलनाला सुरुवात

दि. १ जून २०१२: गडचिरोली येथे आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रक्तदान करून आंदोलनाला सुरुवात केली.
शासन दरबारी शेतकऱ्यांच्या विविध व महत्वपूर्ण मागण्या प्रलंबित आहेत. या
पूर्वी आ. बच्चू कडू यांनी नागपूर येथे पिक्माल निर्यात बंदी तोडो आंदोलन
केले. नंतर मा. मुख्यमंत्र्यांच्या गावी पाच मागण्या घेऊन डेरा आंदोलन
केले. त्या आंदोलनामध्ये मुख्यामान्त्यानी सकारात्मक भूमिका घेत सदर
मागण्यांवर प्रस्ताव तयार करणार अशी घोषणा केली. परंतु कोरडवाहू
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण वगळता बाकीच्या मागण्या अजूनही प्रलंबित
आहेत. 
त्याच कारणावरून आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्र
स्वीकारला आहे. दि. ४ जूनला मुंबई येथे आ. बच्चू कडू सहा शेकडो शेतकरी
बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच शेतकर्यांना या हक्काच्या लढाईत
सामील  होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनात संजय देशमुख, विदर्भ प्रमुख, प्रहार, पप्पू देशमुख,
जिल्हाप्रमुख चंद्रपूर , प्रवीण हेन्डवे, जिल्हाप्रमुख अमरावती, शी
विजुदादा कडू, शेतकरी नेते, फिरोज पठाण, रुपेश घागी, इम्मू भाई, डॉ.
मधुकर गुम्बळे सह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.