शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुणकारी 'बाम' - एक बाम, अनेक काम


३०-४० हजार शेतकर्यांनी मा. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सरकारविरुद्ध व उदासिनतेविरुद्ध रणशिंग फुंकले. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या या एतिहासिक संमेलनास भारतभरातील अनेक शेतकरी नेते हजार होते. हमीभाव, शेतीसाठी पाणी अशा अनेक मागण्यासोबातच आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची मागणी केली. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतातील सर्व कामे रोजगार हमी योजनेत आणावीत व सहाव्या वेतन आयोग प्रमाणे शेतमजुरांची मजुरी ३०० रुपये प्रतिदिन एवढी करावी. महाराष्ट्र सरकारचे रोजगार हमी योजनेचे यावर्षीच्या ६०० कोटींपैकी १०० कोटीही खर्च झाले नाहीत. पण आ. बच्चू भाऊंच्या सूचनेप्रमाणे सरकारने जर रोजगार हमी योजनेत हि कामे घेतली तर शेतकऱ्यांना हा खर्च लागणार नाही व शेती व्यवसायाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा