सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

शेतकरी गर्जना - "आता मरणार नाही... लढणार आम्ही !!!"

जाती-धर्म-भाषा हे भेद विसरून सर्व शेतकर्यांनी, काळ्या आईच्या सर्व लेकरांनी एकत्र या-
शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी डेरा आंदोलन 
चला मुख्यमंत्र्यांच्या गावी- चलो  कराड ! चलो  कराड !! चलो  कराड !!!

चला शेतकर्यानो... उठा शेतमजुरांनो... उठा तरुणांनो... क्रांतीचे पाऊल टाकूया-

शेतकरी बंधुनो,
२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा होत आहे.

१० जाने. रोजी नागपूरला प्रहारच्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले व कापसाचे भाव वाढले.पण सरकार कोणत्या न कोणत्या प्रकारे शेतकर्याना नाडते. त्यामुळे आता सरकारचा पक्का बंदोबस्त करून खालील मागण्यांसाठी २३ सप्टेंबर ला अमरावती येथे महामोर्चा व तेथून असंख्य शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या गावी रवाना होतील व तेथे मागण्या मान्य होईपर्यंत घेराव घालतील. 


या आंदोलना विषयी शेतकरी भवन, माढेळी त. वरोरा, जिल्हा-चंद्रपूर येथे पूर्वतयारी मार्गदर्शन सभा-बैठक
दि. १७ सप्टेंबर रोजी दु. १२ वा.
प्रमुख उपस्थिती- १) श्री पप्पुभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष- प्रहार संघटना
                           २) श्री रुपेशकुमार घागी, विदर्भ प्रमुख, प्रहार विद्यार्थी संघटना

अधिक माहितीसाठी संपर्क- ९२७०२७१५५८, ९७६५४४७४१३ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा