शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

शेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे

चंदुभाऊ वानखेडे, जेष्ठ पत्रकार 
प्रहारचा शेतकरी महामोर्चा, २३ सप्टेंबर २०११ रोजी दसरा मैदान अमरावती येथे मार्गदर्शन करताना 

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितली तीन महिन्याची मुदत...

२६ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, मा. आ. बच्चुभाऊ कडू व इतरांशी चर्चा केली. मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्यांचा राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली.

मागण्यांचे स्वरूप बघून शेतकर्यांनी हि मुदत सरकारला दिली व मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेले शेतकरी, आंदोलन 'तूर्तास' स्थगित करून परतले.

सरकारा सावध... गाठ बळीराजाशी  आहे...

मुदत पाळा, नाही तर रुंमणं   घेऊन आम्ही आहोच तय्यार !!!

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बळीराजा दंड थोपटतो तेव्हा...

वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकरी पेटला. प्रहार चे संस्थापक-अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात, देशभरातील शेतकरी नेत्यांच्या साक्षीनं सुरु झाला महासंग्राम..." भिक नको, ... घेऊ घामाचे दाम! "

थोडक्यात आत्ता पर्यंतचा वृत्त्तांत

२३ सप्टेंबर. दसरा मैदान, अमरावती 
४० हजार शेतकरी एका आवाजात ललकारी देत होते... "आता मरणार नाही, लढणार आम्ही!"
शेतमजुरांची मजुरी व शेतकऱ्यांचे उत्पन्न सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कमीत-कमी ३०० रु. रोज व्हायलाच पाहिजे. त्याकरिता पेरणी-ते-कापणी पर्यंत सर्व कामे रोजगार हमी योजनेतून घ्या, सर्व जमिनीला सिंचनाची व्यवस्था करा, हमीभाव इ. अनेक मागण्यांतून शेतकऱ्याला सन्मानान जगता यावे, त्याच्या घामाच्या धारांसोबत अन्याय होऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या. सुमारे आठ हजार शेतकरी आपलं गार्हाण घेऊन मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे झाले रवाना. पूर्ण अमरावती दुमदुमली... बळीच राज्य येऊ दे !    

२४ सप्टेंबर.
नांदगाव(खं.)- कारंजा- सेलू बाजार- मालेगाव- मेहकर-सिंदखेड राजा
भरगच्च सभा, भारलेलं वातावरण. सगळीकडे बळीराजाचा दबदबा.आ. सुभाष झनक यांचा आंदोलनास पाठींबा.
दिवसभरात अनेक सभा घेण्यात आल्या. सिंदखेड राजा येथे मुक्काम. 

२५ सप्टेंबर.
सिंदखेड राजा -(पूजन व सभा)-जालना- औरंगाबाद- नेवासा- देवगाव(मुक्काम.)  
शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद. हक्काच्या लढाईसाठी गरजणारा शेतकरी. सरकारचे डावपेच सुरु.
सातारा जिल्ह्यात सरकारने जमावबंदी लागू केली. 
रात्री बच्चूभाऊंना अटक करण्यासाठी पोलीस आले असताना, शेतकरी माय-माउलींनी   पदर खोचला..."न्या आमच्या भाऊंना पकडून--- आम्ही मुक्कामास असलेल्या तिसर्या मजल्यावरूनच खाली उडी टाकू---" बच्चूभाऊंसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी हा प्रतिसाद पाहून पोलिसाना ग्यावी लागली माघार...
आता बळीचा राज्य येणार.

आजचा कार्यक्रम 
२६ सप्टेंबर.
शिकारपूर- चाकण- देहू(रक्तदान शिबीर)-पुणे- सातारा
आज सभा व रक्तदान शिबीर घेण्याला सरकार विरोध करतंय. प्रहार रक्त देऊन क्रांती करणारच- रक्तदान शिबीर होणारच... महाराष्ट्रात आजपर्यंत सर्वात जास्त रक्तदान करून रुग्णांना वाचवणारी संघटना आज शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी पुन्हा रक्तदान करणार...

आणि गरज पडलींच तर उद्याही रक्त...

शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत सामील व्हा--- पुणे परिसरातील मित्रहो--- आज दु. चार वाजता देहू येथे येऊन आंदोलनास आपलाही पाठींबा द्या.





शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुणकारी 'बाम' - एक बाम, अनेक काम


३०-४० हजार शेतकर्यांनी मा. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सरकारविरुद्ध व उदासिनतेविरुद्ध रणशिंग फुंकले. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या या एतिहासिक संमेलनास भारतभरातील अनेक शेतकरी नेते हजार होते. हमीभाव, शेतीसाठी पाणी अशा अनेक मागण्यासोबातच आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची मागणी केली. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतातील सर्व कामे रोजगार हमी योजनेत आणावीत व सहाव्या वेतन आयोग प्रमाणे शेतमजुरांची मजुरी ३०० रुपये प्रतिदिन एवढी करावी. महाराष्ट्र सरकारचे रोजगार हमी योजनेचे यावर्षीच्या ६०० कोटींपैकी १०० कोटीही खर्च झाले नाहीत. पण आ. बच्चू भाऊंच्या सूचनेप्रमाणे सरकारने जर रोजगार हमी योजनेत हि कामे घेतली तर शेतकऱ्यांना हा खर्च लागणार नाही व शेती व्यवसायाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील. 

समाजाचं काय ?


बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

मनमोहना, अजब तुझे सरकार...

शहरात जीवन जगण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाकाठी ३२ रुपये पुरेसे आहेत तर खेड्यात २६ रुपये पुरेसे आहेत असं प्रतिज्ञापत्र नियोजन आयोगानं, पंतप्रधानांच्या सहीनिशी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं. त्यापेक्षा जास्त खर्च करू शकणारे बी.पी.एल. (दारिद्र्य रेषे खाली) मध्ये नाहीत. अजूनही मनमोहन आमचा हुशार अर्थतज्ञ आहे असं म्हणून जर कोणी त्याची हुशारी बघून त्यांनी देशाचा चालवलेला खेळखंडोबा सहन करा असं सांगितलं, तर त्याला का तुडवू नये.

सामान्य माणसाची अशी थट्टा करण्याचा अधिकार सरकारला; भारतासारख्या लोकशाही देशातच आहे!

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

आता मरणार नाही, लढणार आम्ही.

दोन सख्या भावांत जेव्हा वाटणी होते, तेव्हा इंच भराच्या अन्यायाच्या फक्त शंकेवरून एक भाऊ दुसर्यावर धावून जातो. वावर पडो, पण धुर्यासाठी लढू - अशी  आमची लढाऊ वृत्ती. पण जेव्हा मायबाप सरकार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन ठिकाणच्या शेतकरी भावांना दोन वेगळ्या मापात तोलते तेव्हा आम्ही या सरकारवर का धावून जात नाही. आमच्या नोकरशहा, कर्मचारी भावाला तुपाशी खाऊ घालताना आम्ही कास्तकार उपाशी आहोत हे या सरकारला दिसत नाही का? खर तर शेतकरी कुठलाही असो, कमी अधिक प्रमाणात नाडल्याच जात आहे. पण ज्याच्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला तो आमचा लढाऊ वैदर्भीय शेतकरी आताही जागणार नाही का ?

चला उठा , दाखवून द्या या काळ्या आईला... तिच्या लेकरांत अजूनही रग आहे. 
चला, आपल्या संपर्कातल्या प्रत्येकाला स्वतःहून आवतन द्या. स्वतः घरच्या रायबाच लग्न सोडून कोंढाणायाच्या  लग्नाला या... आपल्या शिवाजीनं (बच्चुभाऊ) हाक  दिलीय, प्रत्येक तानाजीनं या, प्रत्येक बाजिप्रभून या, प्रत्येक मावळ्यान या... 

काळ्या आईच्या लेकरांसाठी, तिच्या प्रत्येकच लेकारान या...

आता मरणार नाही, लढणार आम्ही.


२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा. 

चलो दसरा मैदान, अमरावती.