बुधवार, १३ जुलै, २०११

...तुम्हीच शिल्पकार !

पुन्हा एकदा बॉम्ब-स्फोट. दहशतवाद्यांचा स्वतःच्या हाताने गळा चिरावा अन त्या रक्तांन या आभाळावर लिहून टाकावं, " खबरदार, हे स्वतंत्र भारताचं आभाळ आहे." पण ज्या देशातील लोक शेपूट घालण्याच्या सवइचे, स्वतःच्या स्वार्थाचे आणि स्वतः काही बनल्याशिवाय देशाकडे लक्ष कसा देऊ अशा घाणेरड्या गुलाम वृत्तीचे असतील तिथे कसाब सारखे लोक येऊन घाण करतीलच. गुलामांच्या देशात स्वातंत्र्याचे काय पोवाडे गायचे? अन हि फक्त भौतिक सुखाची गुलामगिरीच नव्हे तर वैचारिक दिवाळखोरी आणि प्रश्न समजून घेण्याच्या वैचारिक पात्रतेचा आणि तयारीचा अभाव आहे. 

गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे .....

आहे का आज खरच कोणाची हिम्मत ? प्रसंगी रक्ताचे पाट वाहवून या मातीचा स्वाभिमान जपण्याची ? स्वतःच्या घर, कुटुंब यांना दुय्यम स्थान देऊन  देशकार्यासाठी झोकून घेण्याची? 

लढा !!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा