गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

आमच्या अपंग-अनाथांची,शेतकरी-कष्टकर्यांची दुःख घेऊन जा गे मारबत...

दरवर्षीप्रमाणे उद्या अगदी पहाटेला आमचे गावा-गावातील बांधव गावातली सारी मरगळ, दुःख, संकटं आम्ही प्रतिकात्मक रुपाने गावातुन हद्दपार करु. मारबत हाकलुन वाईट प्रवृत्ती व शक्तिंपासुन स्वतःचे रक्षण करणार. परंतु माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या अपंग बांधवांनो... बहुसंख्येने आणि एकदिलाने लढलं तरच टळल ईडा-पिडा आणि येईल बळीचं राज्य.

आपल्या भोवतालच्या १०-२० प्रश्नांपैकी २-३ सोपे प्रश्न सोडवायचे आणि आपल्या कामाचा डंका ठोकायचा, असे अनेक नेते आणि संघटना आपल्या भोवताल असतात. त्यांचा प्रसारमाध्यमे खुप गाजावाजाही करतात. एखाद्या कंपनिच्या इतक्या गुंतवनुकित इतका नफा अशाप्रमाणेच एक साचेबद्ध समाजसेवा. पण अशाही पैरिस्थितीत एक संघटना अशी असते जी परिणाम कधी येतील याचा विचार न करता सामान्यांच्या जगण्याच्या हक्कांसाठी लढत असते- प्रहार तिचे नाव.

अगदी संयमाने इंच-इंच लढवत गेल्या दोन वर्षांपासुन प्रहारचे शेतकरी आंदोलन व सुमारे एक वर्षांपासुन प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुढे सरकत आहे. आता २ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे प्रहार होईल... खर्या वंचितांची शोषितांची लढाई.तुम्ही येणार कि नाही... मारबत हाकलायला?

आझाद मैदान, मुंबई